Vatchal: वाटचाल
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
ही वाटचाल आहे माझ्या सार्वजनिक जीवनाचा मी स्वतः काढलेला आलेख. दर्यासारंग आंग्रे घराण्याची राजधानी, कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण अशा मोठ्या बिरुदांनी आमचे अलिबाग बाह्य जगाला परिचित असले तरी प्रत्यक्षात आजही त्याची लोकसंख्या दहा हजारांपलीकडे फारशी गेलेली नाही. अशा गावात… माझे मॅट्रिकपर्यंतचे आयुष्य गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अलिबागजवळच्या नागाव या अष्टागरातील एका प्रमुख गावी आल्यापासून फक्त शेती-बागायती करणाऱ्या, पोटापुरते मिळविणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नव्याने वकील झालेल्याचा मी मुलगा. एकत्र कुटुंब, प्रमुख व्यवसाय शेती-बागायत. अष्टागरातील शेतकरी कोणत्याही जातीचा असो, आपल्या शेतात, वाडीत स्वतः राबणारा आणि त्यात धन्यता मानणारा. आपले प्रौढ जीवन सार्वजनिक कामात घालवावे असे मला लहानपणापासून वाटत आलेले आहे. शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे स्वराज्याकरिता झटण्याचे आकर्षण. इतिहासात शिवाजीने आणि माझ्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेला धडा गिरवावा अशी स्वप्ने मी पाहात असे. प्रभू रामापेक्षा हनुमान किंवा शिवाजीपेक्षा तानाजीच मला जास्त आवडे. नाथमाधवांचा ‘सावळ्या तांडेल’ पुस्तकरूपाने आणि शिवरामपंत परांजप्यांची ‘गोविंदाची गोष्ट’ चित्रमयजगत् या मासिकात वाचलेली.