Résultats de recherche de titre
Articles 1 à 20 sur 55
Vatchal: वाटचाल
Par Nana Kunte. 1982
ही वाटचाल आहे माझ्या सार्वजनिक जीवनाचा मी स्वतः काढलेला आलेख. दर्यासारंग आंग्रे घराण्याची राजधानी, कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण अशा…
मोठ्या बिरुदांनी आमचे अलिबाग बाह्य जगाला परिचित असले तरी प्रत्यक्षात आजही त्याची लोकसंख्या दहा हजारांपलीकडे फारशी गेलेली नाही. अशा गावात माझे मॅट्रिकपर्यंतचे आयुष्य गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी अलिबागजवळच्या नागाव या अष्टागरातील एका प्रमुख गावी आल्यापासून फक्त शेती-बागायती करणाऱ्या, पोटापुरते मिळविणाऱ्या शेतकरी कुटुंबातील नव्याने वकील झालेल्याचा मी मुलगा. एकत्र कुटुंब, प्रमुख व्यवसाय शेती-बागायत. अष्टागरातील शेतकरी कोणत्याही जातीचा असो, आपल्या शेतात, वाडीत स्वतः राबणारा आणि त्यात धन्यता मानणारा. आपले प्रौढ जीवन सार्वजनिक कामात घालवावे असे मला लहानपणापासून वाटत आलेले आहे. शिवाजीच्या मावळ्यांप्रमाणे स्वराज्याकरिता झटण्याचे आकर्षण. इतिहासात शिवाजीने आणि माझ्या बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेला धडा गिरवावा अशी स्वप्ने मी पाहात असे. प्रभू रामापेक्षा हनुमान किंवा शिवाजीपेक्षा तानाजीच मला जास्त आवडे. नाथमाधवांचा ‘सावळ्या तांडेल’ पुस्तकरूपाने आणि शिवरामपंत परांजप्यांची ‘गोविंदाची गोष्ट’ चित्रमयजगत् या मासिकात वाचलेली.The Partner: द पार्टनर
Par John Grisham. 2015
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या…
बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे!Samajik Vaad: सामाजिक वाद
Par Vinayak Sitaram Sarwate. 1921
आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची…
स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.Sakaratmak Vicharanche Samarthya: सकारात्मक विचारांचे सामर्थ्य
Par Norman Vincent Peale. 2014
द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेला द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत…
झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रद्धेची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही सिकाल की- सर्वोत्तमाची अपेक्षा कशी बाळगावी व ते कसे मिळवावे, तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर व स्वतःवर विश्वास करता ठेवावा, तुमच्या ध्येयसिद्धीसाठी शक्ती कशी विकसित करावी, चिंता करण्याची सवय सोडून ताणमुक्त जीवन कसे जगावे, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध कसे सुधारावेत, तुमच्या परिस्थितीवर काबू कसा मिळवावा आणि स्वतःबद्दल दयाळू कसे बनावे.Reward: रिवार्ड
Par Baba Kadam. 2020
मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची गाजलेली कादंबरी Reward. उत्कंठावर्धक नाट्यने भरलेली कादंबरी.एक दिवस असा भयानक उजाडला, की तळाशी हे…
गाव धरणीकंप झाल्यासारखं हादरलं. गेल्या कित्येक वर्षांत या भागात जे घडलं नाही, ते घडलं! त्या दिवशी खून झाला आणि तोही तातोबाचा.त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास गुराख्याची मुलं माथाडीजवळ जनावरांना पाण्यावर घेऊन गेली होती. त्यांना अचानक ठो… ठो…ऽऽऽ असा आवाज आल्यामुळं भयभीत होऊन त्यांनी इकडंतिकडं पाहिलं, तर समोरून उंबराच्या झाडामागून तातोबा वेड्यासारखा धावत त्यांच्यासमोर आला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या गालातून आरपार अशी बंदुकीची गोळी गेली होती आणि त्याची संपूर्ण जीभ तुटली होती. ओठ आणि नाकपुड्या रक्तानं माखलेल्या होत्या.Reshimgathi: रेशीमगाठी
Par Kanchan Kashinath Ghanekar. 2017
रेशीमगाठी पुस्तकातील काही लेख पूर्वी छापून आले असले, तरी ते जसेच्या तसे इथे छापलेले नाहीत. कारण ते लेख काही प्रसंगाने,…
संदर्भाने लिहिलेले असल्यामुळे ते आता कालबाह्य वाटण्याचा संभव होता. त्यामुळे त्यांचे पुनर्लेखन केले आहे. काही लेख छापताना काटछाट करून छापले गेले होते. ते या पुस्तकात पूर्ण स्वरूपात आहेत. पुस्तकात छायाचित्रांऐवजी रेखाचित्रे घालण्याचे ठरताच, ही कामगिरी श्री. वासुदेव कामत या निष्णात चित्रकारावर सोपविण्यात आली. या रेखाचित्रांसाठी लागणारी बरीचशी छायचित्रे आमच्या घरच्या संग्रहातीलच आहेत.Maharashtrache Shilpkar Vasantdada: महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा
Par Raja Mane. 2011
वसंतदादांचा जीवनकार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची…
मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे, हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करून ते राज्य करू शकले.Islamachi Samajik Rachana: इस्लामची सामाजिक रचना
Par Shreepad Kelkar. 1976
हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ‘ड्रिस्क्रिप्टिव्ह सोशिऑलॉजी’ च्या सूत्रानुसार पुढील संशोधन म्हणून हा ग्रंथ हर्बर्ट स्पेन्सर ट्रस्टीजच्या विनंतीवरून प्रथम लिहिण्यात आला. सर्व…
जगातील मुस्लिम समाजाची समान धार्मिक श्रद्धेतून उद्भवलेली अशी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत ती एक संपूर्ण विषय म्हणून अभ्यासण्याजोगी आहेत. इस्लाम धर्म मानणाऱ्या समाजांची जीवनपद्धती व रचना यांच्यावर इस्लाम धर्माचा किती व कसा प्रभाव पडलेला आहे याचा शोध घेणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे दोन खंड अनुक्रमे १९३१ व १९३३ मध्ये ‘सोशिऑलॉजी ऑफ इस्लाम’ या नावाने प्रकाशित झाले. त्यानंतर परिस्थितीत झालेल्या परिवर्तनाच्या संदर्भात पहिल्या आवृत्तीमधील माहितींत जरूर त्या सुधारणा हे पुस्तक लिहिताना केल्या आहेत.Ikshavakuche Vanshaj: इक्ष्वाकुचे वंशज
Par Amish. 2016
राम राज्य. सर्वार्थानं संपूर्ण भूमी. अर्थातच याची किंमत मोजावी लागते. त्याने ती किंमत मोजली. भारत, इ. पू. ३४०० फुटीरतेमुळे अयोध्या…
कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानाचे परिणाम समाजात कोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनांना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र. देशवासियांनी त्याला जरी यातना दिल्या तरी त्याचं आपल्या देशावर खूप प्रेम असतं. तो कायद्याचा पाठीराखा बनतो. त्याचे तीन भाऊ, त्याची पत्नी सीता आणि तो स्वतः त्या कोलाहलमिश्रीत अंधःकाराविरोधात ठामपणे उभे राहतात. इथरांनी ठेवलेल्या ठपक्यातून राम बाहेर निघू शकतो का? सीतेवरील त्याचं प्रेम त्याला प्राप्त संघर्षांतून तारून नेतं का? त्याचं बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांच्या राजा रावणाचा बीमोड तो करतो का? विष्णूपदाला तो प्राप्त होतो का?Gandhi: गांधी: कार्य व विचारप्रणाली
Par Prof. Bhaskar Ramchandra Bapat. 1973
गांधी आणि माओ या आधुनिक काळातील दोन अलौकिक क्रांतिकारक व्यक्ती होत. ‘पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ ए गन’…
असे म्हणणाऱ्या माओचे गांधींशी काय साम्य असे प्रथमतः वाटते. वरील वचनामध्ये माओ शासनसत्तेविषयी विलक्षण जागरूकता दाखवितो; समाजिक व्यवहारात सत्ता कोणाच्या हाती आहे हा मोक्याचा प्रश्न असतो हे स्पष्ट करतो. गांधी अराज्यवादी म्हणून ओळखले जातात.Boomrang Bhag-2: बूमरँग भाग-२
Par Baba Kadam. 2020
मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग... तिचा हा दुसरा भाग... बूमरँग एक असे…
शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरीचा शेवटचा दुसरा भाग.Boomrang Bhag-1: बूमरँग भाग-१
Par Baba Kadam. 2020
मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि जेष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांची प्रचंड गाजलेली कादंबरी बूमरॅंग.. तिचा हा पहिला भाग... बूमरँग एक असे…
शस्त्र जे फेकले कि परत आपल्याकडेच येते, तशाच आयुष्यातील काही प्रसंग, घटना, आपली कर्म उलटून आपल्यावरच येऊ शकतात. एक उत्कंठावर्धक नाट्यपूर्ण कादंबरी चा पहिला भाग.Bhartiya Musalman: भारतीय मुसलमान
Par Shree Vasant Nagarkar. 1989
प्रा. मुजीब लिखित "The Indian Muslims" या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद भारतीय मुसलमान हा आहे. ब्रिटिश अमदानीत आणि त्यानंतर जे इतिहास…
लिहिले गेले त्यांनाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारच्या इतिहासांची किंवा विशिष्ट ऐतिहासिक घटना अथवा प्रश्न यावर लिहिल्या गेलेल्या प्रबंधांची सर्वसामान्य चर्चा करणे येथे अप्रस्तुत होईल. हा ग्रंथ हिंदी मुसलमानांवर लिहिलेला असल्यामुळे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तुरळक अपवाद वगळता मुसलमान इतिहासकारांनी निष्पक्षदृष्टी ठेवलेली दिसत नाही. त्यामुळे आजवर मुसलमान समाजाचे व्यक्तिमत्व, त्यांचे प्रश्न आणि यशापयश यांचे संपूर्ण आकलन होऊ शकलेले नाही. प्रस्तुत ग्रंथाची मोठी व्याप्ति पाहता उपलब्ध साधनांचा साकल्याने अभ्यास करणे आवश्यक असूनही ते लेखकाच्या आवाक्याबाहेरचे काम होते.Aurangzebacha itihas: औरंगजेबाचा इतिहास
Par Sir Jadunath Sarkar. 1978
सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून…
औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.Vadal: वादळ
Par Dilip Barve. 2019
काहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा…
स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'Uttarkalin Mughal Khand 2: उत्तरकालीन मुघल खंड २
Par William Irwin. 1998
विल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर…
नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.Talghar: तळघर
Par Narayan Dharap. 2022
“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण…
तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते… जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या… कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती… आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला… उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या… आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता… तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे… काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पर्श्य… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे."Swatantrya Sangramache Mahabharat: स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत
Par G. P. Pradhan. 2021
इंग्रजी भाषेवर माझे प्रेम असले, तरी मराठीत लिहिणे मला अधिक आवडते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास…
इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' लिहिले गेले. हे वाचल्यावर आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अधिक अभ्यास करावा, त्यावरील अनेक ग्रंथ वाचावेत, महत्त्वपूर्ण राजकीय घटनांचा स्वतंत्रपणे अर्थ लावावा, आपल्या देशाच्या इतिहासाचा चिकित्सक रीतीने अभ्यास करावा अशी आकांक्षा वाचकांच्या मनात निर्माण झाली, तर मला धन्यता वाटेल.Sant Janabai: संत जनाबाई
Par Dr Suhasini Yashwant Irlekar. 2002
नामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणाऱ्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या…
म्हणतात, त्या या जनाईच्याच! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या. समग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यांच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो!Samajik Karar: सामाजिक करार
Par Vasant Bhagwant Karnik. 1972
झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह…
वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.